सामाजिक विचारांचे प्रबोधन हा संघटनेचा गाभा आहे. भारतीय जनसंघर्ष सेना 'लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, विज्ञानी व एकजिनसी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत आहे. अधिक माहितीसाठी
शाहू महाराज हे एकाच वेळी स्टेस्ट्समन आणि द्रष्टे विचारवंत होते. शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात जे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मॉडेल्स उभे केले; बहिष्कृत वर्ग, शूद्र समाज, भटके, मुस्लिम आणि सर्वच मागास समूहांना सोबत घेऊन सामाजिक प्रगतीचे प्रयत्न केले. ते राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक सर्वच आघाड्यांवरील कार्य आणि क्रांतिकारक विचार हे लोकशाहीचे मॉडेल देणारे आहे. शाहू महाराजांचे हेच कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम भारतीय जनसंघर्ष सेना करत राहणार आहे